
गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखामुळे तो प्रस्थापित राजकीय पक्षांकडून पुरस्कृत तर नाही ना? असा सवाल देखील डॉ.चलवादींनी यानिमित्ताने उपस्थित केला.संतोष देशमुख प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजाश्रयाचे हे जिवंत उदाहरण आहे.लॉरेन्स बिष्णोई सारखे गुंड कारागृहात बसून त्यांची टोळी चालवत आहेत.राज्यात सैफ अली खान,सलमान खान सारखे अभिनेते सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची कल्पना करवत नाही.शिवाय कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे.
राज्यातील अनेक वस्त्या,भागांमध्ये गाव गुंड मोकाट आहेत. यंत्रणेच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक हैराण असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा एकसुत्री कार्यक्रम गृहखात्याने राबवण्याची आवश्यकता आहे.वाढते गुन्हेगारीचे प्रमाण, काही भागांतील जातीय तणाव आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत सायबर गुन्ह्यांत वाढ झाली असून ग्रामीण भागात जमिनीच्या वादांमुळे गुन्हेगारीची वाढ होतानाही दिसत आहे. सरकारने यासंबंधी किमान आता तरी योग्य पावले उचलावीत, अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.


