विहिरीत उडी घेत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या. सोयगावच्या आमखेड्यातील घटना.

सोयगाव दि. २७ (वृत्तसेवा) साडे तीन लक्ष कर्जाचा बोजा डोक्यावर असताना उत्पन्न हाती आले नसल्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत सोयगावच्या आमखेडा भागातील शेतकऱ्याने बुधवरी रात्री एक वाजेच्या सुमारास गावाशेजारी शेतातील विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना दि. २७ गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे. महसूलने घटनेचा पंचनामा केला असून सोयगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. या घटनेमुळे सोयगाव शहरात खळबळ उडाली आहे.
गोपीनाथ वाळुबा मोरे (वय ४२ वर्ष) असे विहिरीत उडी घेत आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे फर्दापुर शिवरात गट क्र. – १९० तीन एकर शेती आहे. खरीप हंगाम हातातून गेल्या नंतर रब्बीच्या हंगामात ही उत्पन्न हाती आले नाही त्यामुळे डोक्यावरील कर्जाचा बोजा फेडण्याच्या चिंतेत त्यांनी बुधवारी रात्रीच आमखेडा गावाच्या शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेतली फर्दापुर शिवारातील शेतीवर त्यांचेकडे बँक ऑफ महाराष्ट्र, विकास सोसायटी, बंधन बॅंक, आय. डी. एफ. सी. बँक, इंडोसन बँक या सर्व बँकांचे अंदाजे कर्ज तीन ते साडे तीन लाख रुपये कर्ज थकबाकी आहे. उत्पन्न च हाती न आल्याने त्यांनी कर्जाची चिंतेत ही टोकाची भूमिका घेतली आहे. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी शवविच्छेदन केले. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मूल, एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे.


